शाळा, महाविद्यालय, याबरोबरच विद्यापीठाच्या विविध परीक्षा आता संपत आल्या आहेत, त्यामुळे जो तो आपापल्या कामात गुंतलेला आहे. ऊन चांगलेच तापायला लागल्याने वातावरणात चांगलीच उष्णता जाणवू लागली आहे. पण तरीही सुट्ट्या मध्ये काहीतरी करावे असे प्रत्येकालाच वाटत असते. त्यामुळे कोणी जॉब्स च्या शोधात आहे तर कुणी सुट्ट्यांचा एन्जोय करण्यासाठी पिकनिक ची तयारी करत आहे. पण परीक्षा संपली कि लगेच उन्हाळी शिबिरे, आणि विविध कॅम्प ची गर्दी होते. आणि अशातच मित्रांशी झालेली ताटातूट मनाला अस्व्स्त करते. कारण कोणी आपल्या गावी जातो किवा कोणी समर जॉब्स च्या कामात अडकतो. एकमेकांशी न होणारा संवाद मग मोबाईल वर होतो. एसेमेस, च्याटीग च्या दुनियेत प्रत्येकाचा तांत्रिक संवाद होतो. सहवासात घालवलेल्या ख्शानाना त्याची सर येत नाही. पण यानिमित्ताने का होईना आपण एकमेकाशी जोडलेलो तर असतो ना....!.मग आपणच ठरवूया कि यात प्रेम असावे कि नुसत्याच भावनांचा तांत्रीकपना....
सचिन एस. अंभोरे,
औरंगाबाद.